विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा

समाजकारण /राजकारण

मी विजय भुजबळ ग्रेट इंडियन या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG GREAT INDIAN THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG


 

Translate /ब्लॉग वाचा जगातील कोणत्याही भाषेत

Breaking

भारतीय स्वा्तंत्र्यलढयातील आदिवासी जननायक बिरसा मुंडा

भारतीय स्वा्तंत्र्यलढयातील आदिवासी जननायक बिरसा मुंडा 
जन्म. १५ नोव्हेंबर १८७५ रांची जवळील लिहतू या खेडेगावात.
बिरसा मुंडा यांनी लढवय्या न्याय हक्का साठी मोठा लढा उभारुन जे महान कार्य केले त्याचला तोड नाही. त्यामुळेच बिरसा मुंडा यांना आदिवासी जननायक हा किताब जनतेनेच बहाल केला.
बिरसा मुंडा यांचा जन्म सुगमा मुंडा आणि करमी हातू या दाम्पात्याच्या पोटी झाला.
त्यां चे वडील शेतमजूर होते. घरच्याम गरीबीमुळे त्यांना इंग्रजी माध्यपमाच्यार चाईबासा इंग्लिश मिशनरी स्कूंलमध्येी शिक्षणाची संधी मिळाली. इंग्रजी शिक्षणामुळे त्यां च्यापवर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्यांजना भारतीय संस्कृीतीचा मनस्वीज अभिमान होता व तो त्यांयनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्वयरवादाचा त्यांनी पुरस्कार केला. ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी काही फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीयांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्याकरीता आदिवासींनी न्या्यालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्थापित करण्यायची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला. १८९४ मध्येत बिहार राज्यात भीषण दुष्काकळ पडला होता. या दुष्काळामध्ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्वार्थी अंतःकरणाने सेवा केली.
ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्काळावर मात करण्याकरिता त्यां नी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्या शोषणाविरुद्ध होते. त्यायमुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्यान माध्यामातून बिरसा मुंडा यांना रोखण्याचा प्रयत्न केला. १८९५ मध्येा बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रि‍टिश सत्ता उखडून टाकण्यातचा संकल्पं त्यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्यानंतर आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता त्यांनी ओळखली. त्यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्याससाठी प्रयत्नव करुन त्यां नी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यलढा पुकारला. १८९७ नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाने ब्रिटिश सरकारविरुद्ध अनेक लढाया करुन त्यांजना जेरीस आणले. त्यांवनी पारंपारिक शस्त्रां द्वारे म्हरणजे धनुष्यनबाण, भाले इत्या दींच्याय साहाय्याने डोंगराळ भागातून ब्रिटिशांवर हल्ले चढवले. ब्रिटिश सरकारकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती. तरीदेखील १८९८ मध्ये तांगा नदीच्या काठावर बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सैन्याला नामोहरम केले. नंतर अतिरिक्त कुमक आल्यायमुळे ब्रिटिशांनी आदिवासी नेत्यांना रोखण्यात यश मिळवले. त्या प्रसंगी सुमारे ४०० आदिवासी शहीद झाले. यात बिरसा मुंडा यांचे योगदान मोठे होते. सन १९०० मध्येा बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करीत असताना, ब्रिटिश सैन्यापने हल्ला चढविला व त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. त्यांरना चक्रधरपूर येथे बंदी करुन रांची कारागृहात त्यांलची रवानगी करण्यांत आली. २० मे १९०० रोजी बिरसा मुंडाला एकांत कोठडीत एकटे ठेवले होते. बिरसा यांनी जेवण करणे नाकारले. त्याच दिवशी ते न्यायालयात बेशुध्द पडले. न्यायालयातून कारागृहात आणले. औषधोपचार सुरु केला. जेल अधिक्षक एंडरसनच्या औषधोपचाराने बिरसाच्या प्रकृतीत सुधारणा दिसत होती. ७ जून पर्यंत बिरसा ठिक होते. मात्र ९ जून १९०० रोजी बिरसा यांना रक्ताची उलटी झाली ते बेशुध्द पडले. त्यातच त्यांचे निधन झाले. मृत्युचे कारण ‘एशियाटिक कॉलरा’ हे शासनाने दिले परंतु एकही लक्षण एशियाटिक कॉलराशी जुळत नव्हते. नेपोलियनला आर्सेनिक देवून जसे ठार मारण्यात आले तिच लक्षणे बिरसा मुंडाच्या शरीरावर दिसत होती. मुंडाच्या प्रथेनुसार त्यांना दफन करावयास पाहिजे होते परंतु कारागृहातच दफन करून मृत्युचा पुरावा नष्ट केला.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق