अच्युतराव सिताराम पटवर्धन
(महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी)
जन्म: ५ फेब्रुवारी १९०५
(अहमदनगर)
मृत्यू : ५ ऑगस्ट १९९२* (वाराणसी)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
शिक्षण : एम.ए.(अर्थशास्त्र)
संघटना : भारतीय समाजवादी पक्ष
प्रभाव : समाजवाद
वडील : हरी केशव पटवर्धन
अच्युतराव पटवर्धन हे स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते होते.
नगरचे प्रतिथयश वकील हरी केशव पटवर्धन यांच्या सहा मुलांपैकी दुसरे अपत्य असलेले अच्युतराव आपले काका सीताराम पटवर्धन यांना दत्तक गेले होते. अच्युतरावांचे प्राथमिक शिक्षण नगर मध्ये झाले होते तसेच ते काशी विश्वविद्यालयाचे अर्थशास्त्राचे द्विपदवीधर होते. पश्चिम महाराष्ट्रातील (विशेषतः नगर जिल्ह्यातील) स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व त्यांनी व त्यांचे थोरले बंधू रावसाहेब पटवर्धन यांनी केले. १९४२ नंतर अनेक वर्षे दक्षिण महाराष्ट्रात भूमिगत राहून यशस्विपणे चळवळीचे कार्य करणारे अच्युतराव इंग्रजांच्या हाती कधीच लागले नाहीत.
अच्युतराव व त्यांचे साथीदार आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण प्रभुतींनी १९३४ साली समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती पण तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चा उपपक्ष असल्याने तेथे समाजवादाला काही थारा मिळणार नाही हे उमगल्याने त्यांनी १९४७ साली भारतीय समाजवादी पक्ष स्थापन केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा